(काल्पनिक )
कुठे तो महाभारतातला संजय ज्याने आपल्या दूरदृष्टीने रणांगणावरची इत्यंभूत माहिती धुतराष्ट्राला दिली आणि कुठे हा कलीयुगातला संजय जो अगदी लीलया इतिहास बदलून रुपेरी पडद्यावर दाखवण्याचा अट्टहास करत आहे.. .
आज जर विश्रामपूरचे राजे असते ( बरोबर कट्यार वाले …. ) आणि म्हणाले असते ,
उठा कविराज अमोल , ही घ्या लेखणी , एक चारोळी माफ तुम्हाला . होऊन जाउद्या , अशी चारोळी करा की काळजात घुसली पाहिजे :)
होय सरकार …ही घ्या…।
काशीबाई म्हणाली मस्तानीला
वाड्यात घालू दोघीजणी पिंगा
नाहीतर बाजीराव मागत बसतील
त्यांच्या आवडत्या भाजक्या शेंगा
वाट बघत काशीबाईंची
मस्तानी राहिली बसून
संजय भन्सालीच्या पिंगाने
लोकांनी घेतले हसून
:) :) :) :)