नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, January 26, 2020

पुरस्कार शास्त्र


पुरस्कार शास्त्र. 🌷
( *काल्पनिक राजकीय लेख* : निव्वळ मनोरंजन हा हेतू , कुणाच्या ही श्रद्धास्थानांना ठेच पोहोचवण्याचा हेतू नाही. टोचला गेल्यास मंडळ जबाबदार नाही 📝 )

विरोधकांचे डोके ठिकाणावर आहे का ?

का हो काय झालं ?

काय झालं म्हणून मलाच विचारता ? अरे ज्या कुणाला पुरस्कार मिळाला आहे त्यांचे कार्य तरी बघा.

प्रश्नच नाही , कौतुक करावं तेवढं थोडं आहे सगळ्याचं . पण त्या एका ...

गप्प बसा. तो एक मास्टर स्ट्रोक आहे. तुमच्यासारख्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना  नाही कळणार ते

होय काय , मग तुम्ही सांगा

हो हो सांगतो की थांबा की जरा

का हो , भाऊंची वाट बघाताय का ? त्यांनी अजून लेख नाही केला प्रकाशित.   .

भाऊंची कशाला वाट बघायची , काही काही पुरस्कार  "ऑड मॅन  आउट " म्हणून द्यायचे असतात . गनिमी कावा असतो तो. असा उघड  करायचा नसतो .

नाही पण त्यांच्या वडिलांनी ६५ च्या युद्धात आपल्यावर बॉम्ब टाकले .

हेच म्हणतो मी तुम्हाला कळत नाही आहे. म्हणूनच आम्ही त्यांना पुरस्कार देऊन शत्रू राष्ट्रावर दबाब वाढवत आहोत. आता हे शत्रू राष्ट्रातील सगळे पायलट एका वेळी राजीनामा देतील आणि आपल्या मुलांना इकडच्या देशात पाठवतील. मग लढणार कोण आपल्याशी ?

पण त्याने बेकायदा वास्तव्य केले

पण आता तो भारताचा नागरिक आहे ना , गेली कित्येक वर्षे अनेक बेकायदा नागरिक इथे आहेत, तेव्हा कुणी त्यांना नागरिकत्व देऊन पद्मश्री दिलीय ? ही सुरवात आहे .

पण त्यांचे महान  कार्य ???

घ्या , आता हे ही आम्हीच तुम्हाला सांगायचे ? पाहिलं गाणं आलं तेव्हा केवढाsढा  होता तो , आता बघा बिचारा केवढांसा झालाय. सध्याच्या महागाईच्या काळात अचूक डायट कसे करावे याचा वस्तुनिष्ठ पाठ या महाशयांनी दिलाय आणि शाळेच्या अभ्यासक्रमात
"पद्मश्रींचा पँटर्न " म्हणून आम्ही लवकरच समाविष्ट करू .मध्यतंरी त्यांचा नवीन अलब्म आलेला
 " मेरा चेहरा क्यू नजर ना आये " आमच्या साहेबाच्या हस्तेच तो प्रकाशित झाला होता. तेव्हाच जवळजवळ ठरले होते 'कोअर कमिटीत 'आमच्या की या महान  व्यक्तीला पुरस्कार द्यायचाच

आणखी काही विशेष ?

त्यांचा जन्म दिवस माहीत आहे ? १५ ऑगष्ट , ते पण लंडन मध्ये . ज्या इंग्रजानी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्यांचा  गावात आपल्या स्वातंत्र्य दिना दिवशी जन्म घायाचा आणि मग शत्रू राष्ट्राची गुपिते काढून आपल्या देशात स्थायिक व्हायचे. येरा गबाळ्याचे काम नाही हो

हो हो खरं म्हणताय तुम्ही , पण त्या तालुक्याने अनेक जणांचे अभिनंदनाचे फलक लावले , यांचे दिसले नाहीत कुठे ?

असं का म्हणता ? आमच्या पक्षाच्या कार्यालयात लावलाय की अभिनंदनाचा फलक . आणि ते ज्या शहरात सध्या राहतायत ना  तिथे सध्या विरोधी पक्षाचे सरकार आहे ना ? आम्ही परत आलो की लावू अभिनंदनाचे फलक

बर ते " भारत रत्न ?"

म्हणूनच म्हणतो  " विरोधकांचे डोके ठिकाणावर आहे का ?" उगाच काही तरी?
 विषय वेगळा आहे, मधेच
' भारत रत्न '  कुठे आले ? आणि आमच्या आधीच्या सरकारने ७० वर्षात काहीही केलेलं नाही , आम्ही निदान ७ वर्षात तरी करून दाखवूच .
२६ फेब्रुवारी आधी बघाच तुम्हाला चांगली बातमी मिळेल

ते ठीक व साहेब पण असं खाली मान घालून मिळमिळीत का बोलताय.

" कभी तो नजर मिलाओ "

 📝२७/१/२०२०
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...