नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, June 6, 2020

जीवनगाणे गातच रहावे


*जीवनगाणे गातच रहावे*

आज ६ जून,  कवयित्री शांताबाई शेळके यांची पुण्यतिथी.  यानिमित्ताने त्यांच्या काही गाण्यांच्या आठवणी 📝

साधारण जून महिन्याच्या  याच सुमारास मृग नक्षत्र लागते आणि नवनिर्मितीची चाहूल चराचराला होते.  एकंदर पुढचा वर्षा ऋतू चा कार्यकाल हा
" *अजब सोहळा!  अजब सोहळा*"
असा असतो मग अचानक केंव्हाही हा पाऊस येतो, तो मातीचा हवाहवासा वाटणारा गंध घेऊनच

 " *आला पाऊस मातीच्या वासात ग*
*मोती गुंफीत मोकळ्या केसात ग* "

मग दरवर्षी सारखे ते WA वर अत्तरांचे भाव कमी होतात पण या गंधाची अनुभूती घेतलेला नकळतपणे गुणगुणतो

*गगना गंध आला*
*मधुमास धुंद झाला*
*फुलते पलाश राणी*
*जळत्या ज्वाला*

सभोवतालचा परिसर हिरवागार होऊ लागतो. मनुष्यप्राणी तर आनंदतोच पण रानपाखरं ही गाणी गावू लागतात.

*सोनसकाळी सर्जा सजला,हसलं हिरवं रान*
*राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान!*

याचबरोबर

*किलबिल किलबिल पक्षी* *बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती* !
*पानोपानी फुले बहरती*, *फुलपाखरे वर भिरभिरती !*


आषाढ सरींचा जोर संपून श्रावणाची चाहूल लागते श्रावणसरींची, उन-पावसाच्या लपंडावाची

'कशी मनातुन मने गुंतती, भाव दाटती उरी
*उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी* '

'जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी
*कधी हास-या, कधी लाज-या, आल्या श्रावणसरी'*

निसर्गाचे मग एक लोभस रुप सगळीकडे बघायला मिळते मग

'नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा

*ऋतु हिरवा, ऋतु बरवा ||'*

नारळी पोर्णीमा झाली की मग परत समुद्रात जाणाऱ्यांना मायेने सांगितले जाते

आज पुनवा सुटलय दमानं
दरियाच्या पान्याला आयलंय उदान
पिऊन तुफानवारा
*माझ्या सारंगा, राजा सारंगा*

तरीही वेळप्रसंगी
सजनान होडीला पान्यात लोटलं
.. अन्

वादळंवार सुटलं गो
वा-यानं तुफान उठलं गो
भिरभिर वा-यात
पावसाच्या मा-यात
सजनान होडीला पान्यात लोटलं
*वादळंवार सुटलं गो !*

निसर्ग आणि मनुष्यप्राणी यांच्यातील रेशीम बंध असेच राहू देत

हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा
धागा अतूट हाच, प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बलांना , देतील पराक्रमाचे
*तुटतील ना कधी ही,  हे बंध रेशमाचे*

शांताबाईंनी असंख्य गाणी लिहिली आहेत, कुणीही यावे आणी ओंजळीभरुन घेऊन जावीत आणि आपापल्या पध्दतीने

*"जीवनगाणे गातच रहावे "*

यानिमित्ताने शांताबाईंचे स्मरण 🙏🏻

मंडळी, लेख आवरता घेण्यापुर्वी.

६ जून म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ( तिथी जेष्ठ शुक्ल त्रयोदशी)  🚩

शांताबाईंच्या या गाण्याने या लेखाची सांगता करतोय

शुभघडीला  शुभमुहुर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे  !!

स्वराज्यतोरण चढे गर्जती
तोफांचे चौघडे
*मराठी पाऊल पडते पुढे!* 🚩

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिध्द होई
तदा संकटी देव धाऊन येई

🚩 *जय जय रघुवीर समर्थ*🚩🙏🏻

अमोल केळकर 📝
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...