कवी- इलाही जमादार याची माफी मागून :-
( मूळ गझल :अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा, बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा )
अंदाज पावसाचा , वाटे खरा असावा
प्रत्येक दिवसाचा , तो वेगळा ठरावा
आषाढ सरी सुगंधी, भेटती काळजाला
केलेत वेध ज्याने, तो शाळेत असावा
शेतावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
ढगात वेदनेचा, अग्नी - बाण शिरावा
का आळ पावसावर, घेता तुम्ही चुकीचा?
की वाटले तुम्हाला, कमी दाब तो असावा!
की वाटले तुम्हाला, कमी दाब तो असावा!
भेटून पावसाला, इतुके विचार आता
काबूत एवढाही, का, अंदाज नसावा
काबूत एवढाही, का, अंदाज नसावा
माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "भलेही'
दाही दिशा सरींनी , तो , गुंतला असावा
दाही दिशा सरींनी , तो , गुंतला असावा
नाही अखेर कळले , नौका कशी बुडाली
भयभीत फोटो सांगे , तो सेल्फीश असावा
संकल्पना : अमोल
No comments:
Post a Comment