भारत वंशात सर्वसाधारपणे ३३ कोटी देव आहेत असा समज आहे. यातील एखाद्या दिवशी दिनविशेषा प्रमाणे काही देव एकदम प्रकाशझोतात येतात.
उदा. दत्त जयंती , श्री गुरुदेव दत्ताचा दिवस .
सारसबागेतील गणपती चर्चेत येतो जेव्हा पुण्यात थंडी पडली की त्याला स्वेटर घातला जातो.
भारत वंशात निवडणूक आली की - प्रभू श्री रामचंद्र आणि त्यांचे मंदिर इ इ इ
बाकी इतर बारा महिने पोर्णीमा , प्रकट दिन, जत्रा , उत्सव हे त्या त्या संदर्भातले देव / देवता आठवण्याचे कारण पुरेसे ठरते.
केल्या काही महिन्यापासून मात्र अचानक पणे ' *महाबली हनुमानाचे'* नाव ब-याच राजकीय नेत्यांच्या मुखी येऊ लागले आहे.
इतके दिवस केवळ तीन राशींची जनता ज्यांना साडेसाती आहे,ते दर शनिवारी साडेसातीवर उपाय म्हणून हमखास मारुतीच्या देवळात दिसायची. पण आता राजकीय नेते , योगी, मुनी - मौलवी ही हनुमानाच्या मागे लागलेत असे वाटते .प्रत्येक जण हा आपल्या धर्माचा , आपल्या जातीचा , आपल्या प्रांताचा आहे असे सांगू लागले आहे. त्यासाठी उदाहरणेही देऊ लागले आहेत.
कुणी म्हणतो आमच्याकडे रहेमान, सुलेमान हा हनुमान म्हणून तो आमचा.
कुणी म्हणतो मारुती स्तोत्रात सुरवातीलाच
'भीम ' रुपी म्हणले आहे तो आमचा.
जितेंद्रियं बुध्दीमतां वरिष्ठं- आमचाच तो , एका धर्माचे म्हणणे.
कोण सांगतो तो ' वनारी' अंजनी सुता आहे - म्हणून आमचा .
आता याचप्रमाणे अजून काही गोष्टी बाहेर येतात का हे बघायचे जसे '
पुण्यवंता - केवळ पुण्याचा ,
'ब्रम्हांडे माउली नेणो' - ठाण्यातील ब्रह्मांड़ मधील
'धूर्त वैष्णव' - वैष्णवांचा इ इ
अर्थात सर्वाना तो आपला वाटत असेल तर चागंलेच आहे. राजकीय गोष्टींना बाजूला ठेऊन सर्वधर्म - जात - समभाव असलेले हे उदाहरण भारत खंडासाठी नक्कीच आशादायी ठरो.
पुढे जाऊन तर असं म्हणावेसे वाटते की या सीमा भारत भूमी पुरत्या संकुचित न ठेवता हनुमानाचे सर्व- धर्म - सम - भाव तत्व ' कोटीच्या कोटी उड्डाण करून झेपावे उत्तरे कडे ' आणि भारत देशाची ' *कीर्ती* ' *चीन* , भूतान, म्यानमार ' पदक्रांत करुन *वाढता वाढता वाढून अखिल मंडलाला भेदून जावी* 🙏🏻🌷
श्री गुरुदेव दत्त
श्रीराम दूतं शरणं प्रपद्दे
📝poetrymazi.blogspot.in
No comments:
Post a Comment