भोसकणे/ काडी टाकणे ( किंवा पिन मारणे)
नित्य गणेश पुराण वाचताना काल वामन बटूची कथा वाचली. मुळ कथा सांगायची गरज नाही सगळ्यांना माहितच आहे. मात्र वरील शब्द जे आजच्या कलियुगात सर्रास वापरले जातात त्याचा उगम मला तिथे सापडला.
भगवान विष्णू बटू वामनाचा अवतार घेऊन दुष्ट बलीला मारायला ( भोसकायला) आले.
बटूने मागितलेला वर 'तीन' पाऊले जमीन, अजिबात देऊ नका असे शुक्राचार्यांनी सांगितले. पण राजा तयार झाला नाही. तरीदेखील शेवटचा उपाय म्हणून शुक्राचार्य सुक्ष्म रुप घेऊन उदक सोडायच्या आधी झरीच्या छिद्राशी जाऊन लपले.
बटू वामनाच्या हे लक्षात आले. त्यांनी छिद्रातून 'काडी' घालून ( पिन टाकून) शुक्राचार्यांना भोसकले. त्यांचा एक डोळा फुटला. पुढची कथा तुम्हाला माहितच आहे.
थोडक्यात तात्पर्य :
जहाल लोक : भोसकून
मवाळ लोक : काडी टोचून ( पिन मारून)
कलियुगातील अनेक 'शुक्राचार्यांना' आपापल्या पध्दतीने नामोहरण करतच आहेत.
*यात "मिडीयारुपी विद्वान वामनांचा" वाटा किती हे सांगायला पाहिजे का?* ☺️
( मवाळ बटू) 📝
No comments:
Post a Comment