ऊन खिचडी साजूक तूप...
वेगळं व्हायचं भारीच सुख’ .
विसूभाऊ बापट यांची अशी एक कविता आहे, हीच कविता आमच्या शब्दात, नियमीत लेखन करणा-यांना समर्पित
लेख चारोळी कविता खूप
रोजचं लिहायचं "भारीच" सुख 📝
एक नाही दोन नाही कडवी बारा,
काव्य कसलं मेलं ते, बाजारच सारा.
हा ग्रुप तो ग्रुप , जिकडे तिकडे तीर
फेसबुक भिंत रंगवायला परत फिर
दिनविशेष ,जयंती सण नी वार
शब्दरूप कोटीने, जीव बेजार
कधी एक दिवस राहीलं तर वाटते चूक
रोजचं लिहायचं "भारीच" सुख 🤗
सगळ्यांना वाटतं माझ लेखन टुकार
टुकार टुकार म्हटलं तरी वाक्य येते जमू
अन् एवढासा लेख झाला तरी त्यातही रमू
राजकीय चारोळी चुगलीत हलकी,
वीतभर प्रसंगाला हातभर लेखणी
अण्णांची माया काय शेठजींना येते?😎
टीका केली म्हणून कोणी दुःख का करते?
कविता अन् विडंबन यात अंतरच खुप,
रोजचं लिहायचं "भारीच" सुख. 😌
दोघांचा लाईक म्हणजे दिवाळी दसरा,
दोघात तिसरा हा लेखाचा नखरा.
कुणी मग शिकवायचं , छान छान ल्यायचं,
गुलुगुलु बोलायचं नी पुढे पुढे ढकलायचं .
आठवड्याला स्तंभ लेख , त्यात एखादी खोडी
फिटतील साऱ्या आवडी निवडी.
लेखनाची अशी ती रेसिपीच काय?
राज-कारण ,कला, हीच आमची माय ,
कधीतरी टिप्पणी करून बसायचं चूप 😷
रोजचं लिहायचं "भारीच" सुख. ☺️
रडले चीडले त्यानी अबोला धरला,🤨
तेव्हा कुठे वेगळा ब्लॉग मांडला.
पण साला अनुदिनीच काही कळतच नाही,
महिन्याच टार्गेट काही पुर होत नाही.
शब्द आहे तर वाक्य नाही ,
लेख आहेत पण पहायला नाही.
संकेतस्थळाची तर तऱ्हाच नवी,
घोटभर लेख द्यायला पण परवानगी हवी
कुणी केकाटल तर ते खपायचं नाही,
मिनीटभरही दुर्लक्ष करायचं नाही.
तरीही मत मांडायला मीच,
प्रतिक्रिया द्यायला मीच.
शुभेच्छा द्यायला ही मीच,
अन् सगळ्यांची मर्जी पण राखायची मीच.😏
जिवाच्या पलीकडे काम झाल खुप,
"लेखन थाबवायचं ही, कळायला लागल सुख."
( आश्वासक )अमोल केळकर 🤪
२४/०२/२१