क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक
; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७०
(अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी )
...संकल्पना : अमोल केळकर
ठाकरे मूळचे बिहारीचः दिग्विजय सिंह: काँग्रेस प्रवक्ते व माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यानी शेवटी शोधून काढले कि, ठाकरे कुटुंबिय मूळचे बिहारचेच. मध्यप्रदेशमार्गे मुंबईत आले. असाच एक शोध 100 वर्षांपूर्वी इंग्रजांनी लावला होता. आर्य मूळचे उत्तरध्रुवावरचे. ते भारतात घुसखोर आहेत. आता असा एक शोध लागला आहे कि, मानवजात मूळची अफ्रिकेची. इतिहासात मानव समूह पोट भरण्याकरिता कित्येक वेळा स्थलांतरित झाला. देश ही अलिकडची कल्पना. परंतु, एक लक्षात घेतले पाहिजे की जेंव्हा जेंव्हा असे समूह स्थलांतरित झाले तेंव्हा तेंव्हा त्यानी नव्या ठिकाणाची संस्कृति आत्मसात करून नव्या जागी स्थायिक होत असत. समजा ठाकरे कधी काळचेे बिहारी असतील तर काय बिघडले? सध्या कित्येक वर्षे महाराष्ट्रात राहतात, इथल्या संस्कृतीत पूर्णपणे मिसळूून गेले आहेत. ते आणि इतर मराठी माणसामध्ये कोठलाही फरक अथवा दुरावा नाही. मग ते मराठी नाही असे कसे म्हणता येईल? अगदी मूळ ठिकाणी पोहोचावायचे असेल तर त्यांना अफ्रिकेतच पाठवावे लागेल व त्यांच्या सोबत किंवा आधी सर्वांनाच तेथे जावे लागेल. मुद्दा आहे जेथे स्थलांतर होते तेथील भाषा-संस्कृति आत्मसात करण्याचा. कोणीही कोठेही स्थलांतरित व्हावे व तेथील संस्कृति आत्मसात करावी. असे झाले तर सर्व वाद मिटतील. धन्यवाद.
1 comment:
ठाकरे मूळचे बिहारीचः दिग्विजय सिंह:
काँग्रेस प्रवक्ते व माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यानी शेवटी शोधून काढले कि, ठाकरे कुटुंबिय मूळचे बिहारचेच. मध्यप्रदेशमार्गे मुंबईत आले. असाच एक शोध 100 वर्षांपूर्वी इंग्रजांनी लावला होता. आर्य मूळचे उत्तरध्रुवावरचे. ते भारतात घुसखोर आहेत. आता असा एक शोध लागला आहे कि, मानवजात मूळची अफ्रिकेची. इतिहासात मानव समूह पोट भरण्याकरिता कित्येक वेळा स्थलांतरित झाला. देश ही अलिकडची कल्पना. परंतु, एक लक्षात घेतले पाहिजे की जेंव्हा जेंव्हा असे समूह स्थलांतरित झाले तेंव्हा तेंव्हा त्यानी नव्या ठिकाणाची संस्कृति आत्मसात करून नव्या जागी स्थायिक होत असत. समजा ठाकरे कधी काळचेे बिहारी असतील तर काय बिघडले? सध्या कित्येक वर्षे महाराष्ट्रात राहतात, इथल्या संस्कृतीत पूर्णपणे मिसळूून गेले आहेत. ते आणि इतर मराठी माणसामध्ये कोठलाही फरक अथवा दुरावा नाही. मग ते मराठी नाही असे कसे म्हणता येईल? अगदी मूळ ठिकाणी पोहोचावायचे असेल तर त्यांना अफ्रिकेतच पाठवावे लागेल व त्यांच्या सोबत किंवा आधी सर्वांनाच तेथे जावे लागेल. मुद्दा आहे जेथे स्थलांतर होते तेथील भाषा-संस्कृति आत्मसात करण्याचा. कोणीही कोठेही स्थलांतरित व्हावे व तेथील संस्कृति आत्मसात करावी. असे झाले तर सर्व वाद मिटतील.
धन्यवाद.
Post a Comment