खरं म्हणजे ही घटना प्रत्यक्ष घडली तेंव्हा आम्ही ३ रीत होतो. ( आमच्या बँचचं एक बरंय. शाळेत कितवीत केंव्हा होतो हे लक्षात ठेवायला सोपं आहे. ८३ ला ३ री, ८५ ला ५ वी, ८९ ला ९ वी. सुदैवानं बेसिक पदवी शिक्षण होई पर्यंत हा क्रम ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो 😷)
८३ साली म्हणजे आम्ही ३ री त असताना भारताने क्रिकेटचा विश्व चषक जिंकला . त्यावेळी आम्हाला हे कितपत माहीत होते हे सांगता नाही येणार. अर्थात ही जाणीव व्हायला काही कालावधी जावा लागला.
माध्यमिक शाळेत असताना मधल्या सुट्टीत साने या आमच्या शाळेजवळच राहणाऱ्या मित्राच्या घरी जाऊन अनेक सामने बघितलेत ( कधी कधी तर पुढचे काही तास बंक करून तिथेच थांबायचो ) . ८३ च्या विश्वविजेत्या संघातील गावसकर,वेंगसरकर,अमरनाथ, वगैरे खेळाडूंची ओळख वाढायला लागली.खेळाची आवड निर्माण झाली. आमच्या शाळेच्या मैदानात मधल्या सुट्टीत तर हक्काने खेळ रंगला. सायकलचे चाक, एखाद्या भिंतीवर विट घेऊन तीन स्टंप काढून, किंवा काहीच नाही तर तीन दगडं ( अभासी स्टंप गृहीत धरून) ठेऊन अनेक विक्रम अनेकांनी रचले. मोठ्या स्टेडिअम वर जाऊन सीझन चेंडू ने वगैरे खेळण्याइतपत मात्र माझी लेवल गेली नाही.
अर्थात पहिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला त्यावरचा " ८३" हा सिनेमा बघायची इच्छा होती. ती आज पूर्ण होणार आहे.
अवांतर :-
अगदी मनापासून सांगायचं तर हिंदी सिनेमा थेटरात जाऊन बघायला मला फारसं आवडत नाही. टिव्ही वर असंख्य जहिरातीच्या भडिमारात अधून मधून सिनेमा बघायाला मिळाला तरी मला हे जास्त सोईचे वाटते ( खिशाला न लागणारी कात्री हे खरे कारण) आणि आजकाल काही महिन्यातच असे सिनेमे टीव्हीवर लागतात
टीव्हीवर लागल्यावर बघू की
या विचारसरणीचा आणखी एक विजय होणार आज ✌🏻
#८३_🏏
अमोल 📝
२०/३/२२
No comments:
Post a Comment