नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, April 17, 2020

गांधारी


गांधारी 😵

सध्या दूरदर्शनवर वर रामायण/ महाभारत/ चाणक्य यासारख्या काही पौराणीक मालिका परत दाखवत आहेत. पौराणिक काळातील अनेक व्यक्तीरेखा या विशेष आहेत यात शंका नाही.

यातील 'गांधारी' या व्यक्तीरेखे बद्दल थोडंसं लिहितोय. काही माहिती ऐकीव, काही आंतरजालावरुन मिळालेली आणि त्यावरुन सुचलेले काही विचार 📝

महाभारतातील या पात्राबद्दल आपल्याला फारच जुजबी माहिती आहे . किंबहुना एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून ( वाईट गोष्ट आहे हे कळत असताना ही) आपण दुर्लक्ष केले की आपण साधारणतः गांधारीची उपमा देतो.

 राजकारण विषयी चर्चेत एका समुहात
*ज्यांची गांधारी पेक्षा जास्त वाईट अवस्था आहे* असे वाक्य वाचले.  अशा व्यक्ती कोण असतील असा विचार केला मग लक्षात आले
राजकारणी कार्यकर्ते ( *अगदी सर्वपक्षीय*)  यांचा मुख्यत्वे यात
 समावेश करता येईल.

आपला नेता चुकतोय हे कळत असूनही केवळ नेत्यांचे आदेश म्हणून त्याच्या सांगण्याप्रमाणे कृती करणारे सगळेच 'गांधारी' चे प्रतिनिधित्व करणारे म्हणायला पाहिजेत. चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर न म्हणू शकणारे सगळेच या वर्गीकरणात सहज बसतात.

गांधारीला आपण केवळ वाईट अर्थाने घेतो की आपल्या
नव-याच्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष /डोळेझाक करणारी स्त्री, त्याच्या चूकांनवर पांघरुण घालणारी इ इ.
आजच्या जमान्यात आपला तो बाब्या, दुस-याचे ते कार्टे असे वागणारे अनेक जण हे गांधारी विचारण सरणीचेच म्हणावे लागतील.
इतकं बदनाम झालेली ही गांधारी प्रत्यक्षात कशी होती हे पाहू ( *खालील बरीच माहिती विविध संकेतस्थळांवरुन साभार*)

गंधार ( कंदहार, अफगाणिस्तान ) देशाच्या राज्याची राजकन्या. १०० कौरवांची ( आणि त्यांची एक बहिण)  आई इतपत माहिती सगळ्यांना आहे. आता माहित नसलेली माहिती

लहानपणीच गांधारीने रुद्राची आराधना करुन शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते
हिच्या वरप्राप्तीची ही हकीगत ऐकूनच भीष्मदिकांनी हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी हिला मागणी घातली. कुरुवंशातील संततिहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता

गांधारीला आंधळ्या धृतराष्ट्रासाठी मागणी घालून भीष्मांनी गांधारचा अपमान केला असे *शकुनीला*( तिच्या भावाला) आयुष्यभर वाटत राहिले. परंतु गांधारीने हा विवाहप्रस्ताव स्वखुशीने मंजूर केला.

आता १०० कौरवांच्या जन्माबद्दल
हिला विवाहानंतर लौकरच गर्भधारणा झाली. कुंतीला युधिष्ठिर नामक पुत्र झाल्याची वार्ता समजताच असूयेने हिने आपला अपुर्‍या दिवसांचा गर्भ बाहेर काढला . त्यामुळे लोळागोळा झालेला मृतप्राय गर्भपिंड पुत्र म्हणून हिला प्राप्त झाले, आणि ही शोकातिरेकाने रडू लागली. हिची ही अवस्था पाहून व्यासांना दया आली आणि त्यांनी त्या गर्भाचे शंभर तुकडे करुन ते एका घृतकुंभामध्ये स्थापन करण्यास सांगितले. काही काळाने हिचा मृतगर्भ पुन्हा जीवित होऊन, घृतकुंभाद्वारे हिला दुर्योधनादि शंभर पुत्र झाले

महत्वाचे थोडे
गांधारी ही भगवान शंकराची परमभक्त होती. कौरवांची वागणूक खलनायकाप्रमाणे असली तरी महाभारतात गांधारीची वर्तणूक अतिशय सालस व धार्मिक होती. ती नेहेमी धृतराष्ट्र व आपले पुत्र यांना राजधर्म व चांगल्या वागणुकीसाठी बोलत असे. पांडवांचे कौरवांशी कितीही टोकाचे वैर असले तरी त्यांना गांधारीच्या बाबतीत परम आदर होता.

युद्धसमाप्तीनंतर गांधारी आणि धृतराष्ट्र पांडवांसमवेत हस्तिनापुरी राहू लागले. सुस्वभावी युधिष्ठिर गांधारीची सर्वतोपरी काळजी घेत असे. परंतु भीम मात्र तिला एकसारखे उणेदुणे बोलून तिच्या पूर्वदुःखाच्या स्मृती ताज्या करीत असे. भीमाच्या या अशिष्ट वर्तनाने तिला वैराग्य उत्पन्न झाले आणि ती, धृतराष्ट्र, कुंती आणि विदुर यांच्यासमवेत वनात गेली. तेथे व्यासाने तिला, कुंतीला आणि धृतराष्ट्राला मृत पुत्रांचे दर्शन घडविले. तदनंतर गंगाद्वारानजीकच्या वनामध्ये लागलेल्या दावानलात गांधारी, धृतराष्ट्र आणि कुंती एकत्र जळून भस्म झाले.

कदाचित त्यावेळच्या परिस्थितीने तिला गप्प रहावे लागले असेल तरिही *वेळोवेळी धुतराष्ट्र, दुर्योधन  यांना ती धोक्याची सूचना ( चुकीचे वागत आहात असे सांगणे) देतच होती*

*थोडक्यात अांधळेपणाने आपापल्या नेत्यांचे आदेश / निर्णय/ मान्य करणा-या  सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यापेक्षा 'गांधारी' थोडी उजवी होती असे म्हणता येईल का?*
 ✨⚡✨

📝अमोल
१८/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...