नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, April 4, 2020

दिवे लागले रे


मंडळी नमस्कार 🙏🏻

गेले काही दिवस  सगळेजण  अनेक प्रकारचे  "दिवे " लावत आहेत. कुणी म्हणतंय
' मालवूनटाक दीप 'तर कुणी  म्हणतंय

' दिवे लागले रे , दिवे लागले रे '
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठींच्या दिशा  तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले

थोडक्यात कुठे 'दिया जले' कुठे 'ना जले '  पण प्रासंगिक लेखन करणारे लेखक असोत , विनोंद / व्यंगचित्र बनवणारे/ विडंबनकार/ मिम्स / चुटकुले करणारे असोत, ख-या कलाकारांच्या डोक्यात विषयाला अनुसरून
' ट्यूब पेटतेच '. बाकीचे मग ते पुढे ढकलून मजा बघतात.

अर्थात आम्हाला ही दोन उदाहरणे आठवली:-

शनी महाराजांच्या साडेसातीत  हात - पाय तोडला गेलेला राजा 'विक्रमादित्य' घाणा ओढत असताना  एकदा संध्याकाळच्या वेळेला 'दीप' राग आळवत असतो. त्या रागाने अचानक सगळीकडे नगरीत दिवे प्रकाशतात . हे पाहून राजकन्या हा राग म्हणणा-याला घेऊन या असा आदेश देते . सेवक राजा विक्रमादित्याला ( जो त्या क्षणी चोर म्हणून शिक्षा भोगत असतो ) घेऊन येतात . त्याचवेळी साडेसाती संपल्याने शनी प्रकट होतात आणि राजाला मूळ रूप प्रदान करतात.  संपूर्ण कथा पाहिजे असल्यास इच्छूकांनी शनी महात्म्य वाचावे.

दुसरे उदाहरण  तानसेन चे

आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तानसेन ने अकबराच्या दरबारात नवरत्नांच्यात स्थान मिळवलेले असते. ही गोष्ट इतरांना रुचत नाही. तानसेनचा काटा काढण्यासाठी  मग इतर रत्ने एक कटकारस्थान रचतात.

ते सर्व अकबराच्या मनात भरवतात  की  'राग दीप ' तानसेन शिवाय कुणी चांगला गाऊ शकत नाही .

या  रागाचा परिणाम काय होईल हे सांगितल्याशिवाय तानसेन
 ' दीपक ' राग सादर करण्यास नकार देतो .
मात्र राजा हुकूम देतो आणि तानसेनचा पण नाईलाज होतो.

तानसेन जसा ' दीप ' राग म्हणावयास सुरवात करतो तशी गर्मी वाढायला लागते. संपूर्ण वायूमंडल अग्नीमय होते , ऐकणारे स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळतात , तानसेनच्या शरीराला अग्नी घेरतो.

 अशा प्रसंगी तानसेनच्या मुली
 ' मेघ मल्हार ' गाऊन त्यावेळी परिस्थिती निभाऊन नेतात . मात्र या घटनेनंतर काही महिन्यांनी परत ज्वर होऊन तानसेन यांचे निधन होते.

अशा या दोन गोष्टी आज आठवल्या.म्हणून सांगितल्या

प्रथेप्रमाणे लेखनाचा शेवट काही ' टुकार'  ओळींनी

'अंधेर नगरी चौपट राजा'
'रात्रीस खेळ चाले'
'समांतर', 'गाणारा मुलुख' पाहून
 सारे ' असंभव ' झाले

एक आठवण : संध्याकाळी प्रदोष व्रत करून दिवे लावायला  विसरू नका
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

📝अमोल
०५/०४/२०२०
poetrymazi.blogspot.in
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...